Saturday, April 11, 2009
सुनील गायकवाड (भाजप) आणि अॅड. बाबासाहेब गायकवाड (बसप) लढणार आहेत.
लातूर राखीव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी पत्रकार परिषदेत सांगतले की, जयवंत आवळे (काँग्रेस), सुनील गायकवाड (भाजप) आणि अॅड. बाबासाहेब गायकवाड (बसप) लढणार आहेत. नोंदणीकृत राजकीय पक्षांचे १३ उमेदवार असून त्यात माजी आमदार टी. एम. कांबळे (रिपब्लिकन पाटीर् ऑफ इंडिया डेमॉक्रेटिक) जनसुराज्य शक्तीचे तुकाराम गन्ने यांचा समावेश आहे. ५ उमेदवार अपक्ष आहेत. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये जास्तीत जास्त १६ नावे समाविष्ट होऊ शकतात. परंतु, लातुरात १८ उमेदवार झाल्यामुळे दोन मशीनचा वापर करावा लागणार आहे. लातूर मतदारसंघात आतापर्यंत आचारसंहिताभंगाचे ८ गुन्हे दाखल झाले असून त्यांच्याविरुध्द कारवाईही झाली आहे. लातूर जिल्ह्यात ६१८ शस्त्र परवानाधारक असून त्यातील ४६० शस्त्रे जमा झाली आहेत. अनेकांनी शस्त्र बाळगण्याविषयी अर्ज दाखल केले असून त्याची छाननी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख संजय लाठकर यांनी दिली.
-----------------------
-----------------------
हे जयवंत आवळे कोण? कोणाचे?
हो नाही करत काँग्रेस पक्षाने बुधवारी माजी समाजकल्याण मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जयवंत आवळे यांची उमेदवारी लातूर मतदारसंघासाठी घोषित केल्याची बातमी लातूरमध्ये येऊन पोचताच मतदार नागरिकांत हे जयवंत आवळे कोण? याची चर्चा सुरू झाली. काँग्रेस कार्यकतेर् आणि राजकीय कार्यर्कत्यांत मात्र आवळे विलासरावांचे?, दिलीपरावांचे? की शिवराज पाटील यांच्यापैकी कोणाचे असावेत यासंबंधी आडाखे बांधणे सुरू झाले आहे. लातूर मतदारसंघासाठी वर्षानुवषेर् काँग्रेस पक्षाची निष्ठेने सेवा करणाऱ्या स्थानिक २९ दलित कार्यर्कत्यांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाने विविध इच्छुकांचा मुलाखती घेण्याचा फार्सही यशस्वी केला होता. त्यानंतर अभ्यासू तरुण वकील असलेल्या लातूर नगराध्यक्षांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून विविध वाहिन्यांनी दाखविण्यास सुरुवात करताच ९ उमेदवार एकत्र आले आणि त्यांनी मुळ दलिताला उमेदवारी देण्यात यावी, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने लातूरशी काडीचाही संबध नसलेल्या जयवंत आवळे यांना उमेदवारी देऊन लातूरची जनता म्हणजे काँग्रेसची बांधील आहे, असा समज करून घेतला आहे का? असा सवाल विचारला जात आहे. क्रीडामंत्री दिलीप देशमुख यांनी मात्र उमेदवार घोषित होण्यापूवीर्च भाजपाने रामाला फसवले आहे, आता रामही काँग्रेसलाच मते देईल, अशी तिखट टीका करीत प्रत्येक तालुक्यात काँग्रेस कार्यर्कत्यांचे मेळावे घेऊन यंत्रणा सज्ज केली आहे. आता प्रश्न एवढाच आहे की, या वेळी उमेदवार कोण हे न पाहता मी जामीनदार आहे असे विलासराव म्हणणार की, दिलीपराव की, शिवराज पाटील या वाक्याची वाट पहावी लागणार आहे, असे लोकच उघडपणाने बोलू लागले आहेत. जयवंतराव आवळे यांचे ३ एप्रिल रोजी आगमन होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. त्रिंबकदास झंवर यांनी दिली.
लातूरचे ज्येष्ठ विधिज्ञ बळवंतराव पांडे यांचे निधन
लातुरातील ज्येष्ठ विधिज्ञ बळवंतराव पांडे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. दिवंगत बळवंतराव पांडे यांनी १९७० पर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात न्यायधीश म्हणून काम केले त्या नंतर नोकरीचा राजीनामा देऊन त्यानी लातुरात वकिली सुरू केली. १९७८ साली स्थापन झालेल्या जनता पक्षाचे त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले होते. सातूर वकील मंडळ, श्री केशवराज मंदिर देवस्थानचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अॅड संजय, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
----------------------------------
मुंडेंचा जयसिंगरावांशी पुन्हा 'दोस्ताना'
राजकारणात कधीही कुणीही कायमचा मित्र वा शत्रू असू शकत नाही... याच उक्तीचा परिचय बीडमध्ये पुन्हा एकदा आला. कधीकाळी एकमेकांचे लंगोटी यार असलेले गोपीनाथ मुंडे व जयसिंगराव गायकवाड एकमेकांचे कट्टर हाडवैरी बनले आणि शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भेटीनंतर पुन्हा एकदा त्यांचा ‘ दोस्ताना ’ जुळून आला. बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत असलेले गोपीनाथ मुंडे यांनी तेथील विद्यमान खासदार जयसिंगराव गायकवाड यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. भेटीसाठी त्यांनी वेळ निवडली ती मध्यरात्री पावणे दोन वाजताची... जयसिंगराव गायकवाड गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेवर निवडून गेले होते. परंतु यावेळी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर जयसिंगरावांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जयसिंगराव गायकवाड हे कधीकाळी भाजपमध्ये होते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि जयसिंगराव गायकवाड यांचा दोस्ताना सर्वपरिचित होता. परंतु ११ वर्षांपूर्वी जयसिंगरावांचे महाजन-मुंडेंशी पटेनासे झाले. त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला. या काळात जयसिंगराव आणि महाजन-मुंडे यांच्यातून विस्तवही जात नव्हता. परंतु जयसिंगराव शिवसेनेत आल्यानंतर मुंडे आणि त्यांच्यातील मतभेद आता पुन्हा संपुष्टात आले आहेत. मध्यरात्री झालेल्या भेटीनंतर या दोन मित्रांमधील सर्व मतभेद मिटल्याचे दोघांनीही सांगितले. मध्यंतरीच्या काळात आमच्यात मतभेद निर्माण झाले होते. परंतु आता माझा मित्र मला पुन्हा सापडला आहे, अशी प्रतिक्रिया गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केली. तर आमची दोस्ती म्हणजे फेविकोल का मजबूत जोड आहे, अशी कोपरखळी जयसिंगराव गायकवाड यांनी मारली. बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या प्रचारासाठी जयसिंगराव आता हिरीरीने पुढाकार घेणार आहेत
----------------------------------
मुंडेंचा जयसिंगरावांशी पुन्हा 'दोस्ताना'
राजकारणात कधीही कुणीही कायमचा मित्र वा शत्रू असू शकत नाही... याच उक्तीचा परिचय बीडमध्ये पुन्हा एकदा आला. कधीकाळी एकमेकांचे लंगोटी यार असलेले गोपीनाथ मुंडे व जयसिंगराव गायकवाड एकमेकांचे कट्टर हाडवैरी बनले आणि शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भेटीनंतर पुन्हा एकदा त्यांचा ‘ दोस्ताना ’ जुळून आला. बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत असलेले गोपीनाथ मुंडे यांनी तेथील विद्यमान खासदार जयसिंगराव गायकवाड यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. भेटीसाठी त्यांनी वेळ निवडली ती मध्यरात्री पावणे दोन वाजताची... जयसिंगराव गायकवाड गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेवर निवडून गेले होते. परंतु यावेळी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर जयसिंगरावांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जयसिंगराव गायकवाड हे कधीकाळी भाजपमध्ये होते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि जयसिंगराव गायकवाड यांचा दोस्ताना सर्वपरिचित होता. परंतु ११ वर्षांपूर्वी जयसिंगरावांचे महाजन-मुंडेंशी पटेनासे झाले. त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला. या काळात जयसिंगराव आणि महाजन-मुंडे यांच्यातून विस्तवही जात नव्हता. परंतु जयसिंगराव शिवसेनेत आल्यानंतर मुंडे आणि त्यांच्यातील मतभेद आता पुन्हा संपुष्टात आले आहेत. मध्यरात्री झालेल्या भेटीनंतर या दोन मित्रांमधील सर्व मतभेद मिटल्याचे दोघांनीही सांगितले. मध्यंतरीच्या काळात आमच्यात मतभेद निर्माण झाले होते. परंतु आता माझा मित्र मला पुन्हा सापडला आहे, अशी प्रतिक्रिया गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केली. तर आमची दोस्ती म्हणजे फेविकोल का मजबूत जोड आहे, अशी कोपरखळी जयसिंगराव गायकवाड यांनी मारली. बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या प्रचारासाठी जयसिंगराव आता हिरीरीने पुढाकार घेणार आहेत
प्रियंका गांधींचा मोदींना टोला
काँग्रेस पक्षाचा ‘ बुढिया ’ (म्हातारी) असा उल्लेख करणारे भाजप नेते व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आज काँग्रेसच्या स्टार कँपेनर प्रियंका गांधी यांनी जोरदार टोला लगावला. मी तुम्हाला ‘ बुढिया ’ वाटते का, असा सवाल करत प्रियंका आज अमेठीमध्ये आपला भाऊ राहुल गांधी याच्या प्रचारासाठी फिरत होती.
राहुल गांधी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. आज त्याच्या प्रचारासाठी त्याची बहिण प्रियंका मतदारसंघात फिरत होती. काँग्रेस हा म्हाता-यांचा पक्ष नाही, असे मतदारांवर बिंबवण्याचा प्रियंकाचा प्रयत्न होता. क्या मै बुढी दिखती हूँ ? सोनियाजी, राहुल किंवा मी म्हातारे वाटतो का ? असा सवाल तिने खलिदपूर गावातील मतदारांना केला.
काँग्रेस ही १२५ वर्षांची म्हातारी पार्टी आहे. त्याऐवजी ३० वर्षांच्या तरुण भारतीय जनता पार्टीला मत द्या, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशात भाजप उमेदवारांचा प्रचार करताना केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रियंका मतदारांना हा सवाल करत होती. यूपीए सरकारच्या काळात अनेक विकासकामे झाल्याचा दावाही तिने यावेळी केला.
राहुल गांधी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहे. आज त्याच्या प्रचारासाठी त्याची बहिण प्रियंका मतदारसंघात फिरत होती. काँग्रेस हा म्हाता-यांचा पक्ष नाही, असे मतदारांवर बिंबवण्याचा प्रियंकाचा प्रयत्न होता. क्या मै बुढी दिखती हूँ ? सोनियाजी, राहुल किंवा मी म्हातारे वाटतो का ? असा सवाल तिने खलिदपूर गावातील मतदारांना केला.
काँग्रेस ही १२५ वर्षांची म्हातारी पार्टी आहे. त्याऐवजी ३० वर्षांच्या तरुण भारतीय जनता पार्टीला मत द्या, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशात भाजप उमेदवारांचा प्रचार करताना केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रियंका मतदारांना हा सवाल करत होती. यूपीए सरकारच्या काळात अनेक विकासकामे झाल्याचा दावाही तिने यावेळी केला.
विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर समझोता नाही - उद्धव
केंद्रीय कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी इतका भिकार कारभार केला असताना त्यांना पंतप्रधानपदाकरिता पाठिंबा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर समझोता करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीकरिता शिवसेनेचा ‘वचननामा’ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार या केवळ वावडय़ा असून त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. शरद पवार यांच्या कारभाराबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाकरिता त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही. शिवसेनेने राष्ट्रपतीपदाकरिता प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. परंतु त्यापूर्वी शिवराज पाटील यांचे नाव काँग्रेसकडून पुढे आले तेव्हा त्याला विरोध केला. शिवराज हेही मराठीच होते. म्हणजे केवळ मराठी हा पाठिंबा देण्याचा निकष नव्हता व आताही असू शकत नाही. जनतेचे व विशेष करून महाराष्ट्राचे प्रश्न सोडविणाऱ्या व्यक्तीला शिवसेना प्राधान्य देईल. राज ठाकरे यांच्या मनसेबद्दल विचारले असता एवढय़ा मोठय़ा कार्यक्रमात एवढे छोटे प्रश्न विचारू नका, असे उद्धव उद्गारले. राज यांना बाळासाहेबांनी उत्तर दिले आहे, असे उद्धव म्हणाले. मात्र त्याउपरही राज ठाकरे कुणाची मते खाणार, असे विचारले असता ठाकरे म्हणाले की, शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मतदारांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ऋणानुबंध आहे. गेल्या ४२ वर्षांत अनेकांनी शिवसेनेला मतपेटीतून धक्का देण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणालाही ते जमले नाही. कुर्ला येथील महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात ‘इधरसे-उधरसे’ हेही होते. परंतु ९०० मतांनी ती जागा शिवसेनेने जिंकली. मनसेचा लोकसभा निवडणुकीत फारसा प्रभाव राहणार नाही व शिवसेनेच्या उमेदवारांना त्यांच्यापासून धोका पोहोचणार नाही, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात हिंदुत्व, राम मंदिर, आर्थिक प्रश्न याला थारा दिला नसल्याकडे ठाकरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शिवसेना हिंदुत्व सोडणे अशक्य आहे. हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे. राम मंदिर बांधले गेले तर शिवसेनेचा त्याला संपूर्ण पाठिंबा आहे. मात्र तो भाजपच्या जाहिरनाम्यातील मुद्दा आहे. आर्थिक प्रश्नांची जाण असलेल्या मनमोहन सिंग यांनी देशाची काय वाट लावली ते तर दिसतच आहे.
युती-आघाडीवाले भंपक
युती आणि आघाडीवाले दोघेही भंपक असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्य सरकारने आजवर केलेला अन्याय लक्षात ठेवून मतदानाला उतरा, आणि त्यांना धडा शिकवा, असे आवाहन नागरिकांना केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ईशान्य मुंबईतील उमेदवार शिशिर शिंदे यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांनी भांडूप येथे सभा घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मराठी माणसाचा मुद्दाही त्यांनी पुन्हा एकदा लावून धरला. देशातील राज्यकर्त्यांच्या कुचकामी धोरणांमुळे आतापर्यंत तीन पिढ्या वाया गेल्या आहेत, असे सांगून शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची छूपी युती असल्याचा पुर्नआरोप त्यांनी केला. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचाही ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. भाजप केंद्रात साडेचार वर्षे सत्तेत होते. त्यावेळी का राम मंदिर बांधले नाही. इतके दिवस काय मुहुर्त शोधत होते काय,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नवनवीन आश्वासने द्यायची आणि लोकांची माथी भडकावयाची हेच काम भाजपने केले. अफझल गुरुला 2001 ते 2004 या काळात फाशी का दिली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठी माणसाबद्दलचे आंदोलन कायम सुरु ठेवणार असल्याचे सांगून ते म्हणाले, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय आपण कोणाच्या हाताखाली काम करु शकणार नाही. अभिताभ आणि जया बच्चन यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खासदार निवडून गेले, तर संसदेमध्ये मराठी माणसाचा अपमान करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आजचे भविष्य
आजचे भविष्य
मेष : आर्थिक प्राप्ती अपेक्षे-प्रमाणे होईल. खर्चही तसाच होईल. फळफळावळांच्या व्यापारात फायदा होईल. इतरांचे सहकार्य घ्या. महिला : वैवाहिक सौख्य लाभेल. इतरांच्यावर अवलंबून असलेली कामे हाती घ्या. युवक : विरंगुळा म्हणून छोटी ट्रिप काढा. लॉंग ड्राईव्हला जा किंवा बाहेर फेरफटका मारा.
मेष : आर्थिक प्राप्ती अपेक्षे-प्रमाणे होईल. खर्चही तसाच होईल. फळफळावळांच्या व्यापारात फायदा होईल. इतरांचे सहकार्य घ्या. महिला : वैवाहिक सौख्य लाभेल. इतरांच्यावर अवलंबून असलेली कामे हाती घ्या. युवक : विरंगुळा म्हणून छोटी ट्रिप काढा. लॉंग ड्राईव्हला जा किंवा बाहेर फेरफटका मारा.
वृषभ : नोकरीत काम वाढेल व ते एकट्याने करावे लागेल. धंदा व्यवसायात नुकसान होण्याची भीती राहील. महिला : गृहिणींचे काम वाढेल. इतरांनी केलेली टीका ऐकून घ्यावी लागेल. युवक : विचारांची दिशा चुकण्याची शक्यता आहे. पण आज घेतलेले कष्ट वाया जाणार नाहीत.
मिथुन : संततीच्या सहवासाचा आनंद घ्याल. नशिबाची थोडी साथ राहील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महिला : धार्मिक कामात लक्ष घालाल. संततीकडे लक्ष राहील. शारीरिक तक्रारीकडेही लक्ष असू द्या. युवक : रोमॅंटिक मूडमुळे आपल्या कर्तव्यात कसूर होऊ देऊ नका. शिक्षणासाठी पैशाची तरतूद करा.
कर्क : कामात शिथीलता येईल. जोखमीच्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करा. महिला : हाऊसकिपिंगकडे लक्ष राहील. शारीरिक थकवा जाणवेल. घरातील यंत्रांची दुरुस्ती निघेल. युवक : घराला तुमचा आधार वाटेल. वाहनांच्या मेन्टेनन्सकडे लक्ष द्या
सिंह : नोकरीत वरिष्ठ विश्वासाने तुमच्यावर अधिक जबाबदारीची कामे सोपवतील. गाठीभेटी घ्या. छोटा प्रवास घडेल. महिला : भावंडांची जबाबदारी घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनात ताणतणाव जाणवतील. तरीही उत्साही कार्यरत रहाल. युवक : मनोबल चांगले राहील. "रिझल्ट ओरिएंटेड' रहाल.
विजयी धोनी ब्रिगेडचे ग्रॅंड वेलकम
न्यूझीलंडच्याच भूमीत किवींना चारीमुंड्या चीत करुन इतिहास रचणारी धोनी ब्रिगेड गुरुवारी सकाळी मायदेशी परतली. धोनीचे धुरंधर भारतात पोहचताच वेगवेगळ्या मार्गाने स्वगृहाकडे रवाना झाले. परंतु प्रत्येक ठिकाणी टीम इंडियाच्या या स्टार्स खेळाडूंचे "ग्रॅंड वेलकम' करण्यात आले.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसमवेत पाच भारतीय खेळाडूंचे गुरुवारी सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झाले. एकदिवसीय व कसोटी सामन्यात भारताच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरलेले तेंडुलकर, झहीर खान, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, मुनाफ पटेल येथून आपल्या स्वगृही परतले. अत्यंत लांबच्या व कंटाळवाण्या प्रवासामुळे खेळाडू थकल्यासारखे दिसत होते. परंतु न्यूझीलंडमध्ये घडवलेल्या पराक्रमाची चमक त्यांच्या डोळ्यात स्पष्ट जाणवत होती."कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी आणि देशाच्या उत्तर भागामध्ये राहणारे खेळाडू दुसऱ्या एका विमानाने थेट दिल्लीला रवाना झाले. तसेच राहुल द्रविड, व्ही. व्ही.एस. लक्ष्मण आणि दिनेश कार्तिकसारख्या दक्षिण भारतात राहणाऱ्या काही खेळाडूंनी येथून आपल्या शहरासाठी फ्लाईट पकडली. कर्णधार धोनी समवेत न्यूझीलंड दौऱ्यावरील ऐतिहासिक विजयाचा नायक ठरलेला दिल्लीकर सलामी फलंदाज गौतम गंभीर, धडाकेबाज सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, टीम इंडियाचा स्पिडस्टर ईशांत शर्मा, ऑफ स्पिनर अमित मिश्रा हे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले, तेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट-प्रेमींनी एकच गर्दी केली होती. या ऐतिहासिक दौऱ्यानंतर खेळाडूंची पहिली प्रतिक्रिया मिळवण्यासाठी पत्रकारांचीही झुंबड उडाली. परंतु त्यांच्या हाती निराशाच लागली. हे सर्व खेळाडू पत्रकारांशी संवाद न साधताच आपल्या सुरक्षारक्षकांच्या साथीने निघून गेले.यावेळी वीरेंद्र सेहवागसमवेत त्याची पत्नी आरती होती तर ईशांतचे वडील विजय शर्मा हे परदेशात भारताचा झेंडा उंचावणाऱ्या आपल्या लाडक्या मुलाला घ्यायला विमानतळावर आले होते.मंगळवारी वेलिंग्टन येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने भारतीय संघाला विजयाची हुलकावणी दिल्यानंतर भारताने ही मालिका 1-0 ने आपल्या नावे करुन इतिहास घडवला. तत्पूर्वी भारताने हॅमिल्टन कसोटीत 10 विकेटनी शानदार विजय साकारला तर नेपियर कसोटी अनिर्णीत राहिली. गेल्या 41 वर्षात न्यूझीलंडच्या भूमीत भारताचा हा पहिला कसोटी विजय ठरला.यापूर्वी 1967-68 मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांच्या संघाने हा कारनामा करुन दाखवला होता. तत्पूर्वी भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने बाजी मारली आणि न्यूझीलंडच्या भूमीतील भारताचा पहिला एकदिवसीय मालिका विजय आहे.
आम्ही ठरवू पंतप्रधान
लोकसभेच्या निवडणुकीनंतर चौथी आघाडी म्हणजेच आम्ही तिघे भाऊ ठरवू तोच नेता पंतप्रधान होईल, असा आत्मविश्वाससमाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष राम विलास पासवान यांनी गुरुवारी संयुक्त जाहीर सभेत व्यक्त केला. या तिन्ही नेत्यांनी येथील प्रचारसभेत कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षावर कडाडून टीका केली. भारतीय जनता पक्षावरही जोरदार हल्ले चढवले. लालूप्रसाद म्हणाले, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यात धर्मांध शक्तींना धूळ चारण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. आम्ही संघटितपणे गरीब आणि दुर्बलांची लढाई लढत आहोत. आपणच दलितांच्या तारणहार असल्याची ढोंगबाजी करणाऱ्या मायावती याच दलितांच्या सर्वात मोठ्या शत्रू असल्याचा हल्ला पासवान यांनी चढवला. बसपचा हत्ती भांडवलदारांच्या दावणीला बांधला गेल्याची टीकाही त्यांनी केली. या निवडणुकीत उत्तर प्रदेशात बसप आणि कॉंग्रेस, भाजप या तिन्ही पक्षांचा मतदार दणकून पराभव घडवतील, असे भाकीत मुलायम सिंग यादव यांनी केले.
बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार कोण
मुंबई, राष्ट-वादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते विलासराव देशमुख हे रासर्वांत लोकप्रिय नेतेज्यातील असल्याचे एन.डी. टी.व्ही. या वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. या सर्वेक्षणात राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 30 जागा कॉंग्रेस-राष्ट-वादी आघाडीला तर 18 जागा शिवसेना-भाजपा युतीला मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एन. डी. टी. व्ही. या वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात 28 टक्के मतदारांनी शरद पवार यांना सर्वोत्तम नेता म्हणून कौल दिला आहे. तर 25 टक्के मतदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पसंती दिली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख लोकप्रियतेत त्यांच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असून 15 टक्के मतदारांनी त्यांना सर्वोत्कृष्ट म्हणून पसंती दिली आहे. राज ठाकरे चौथ्या क्रमांकावर असून 12 टक्के मतदारांनी त्यांना कौल दिला आहे.राज्यात कॉंग्रेस-राष्ट-वादी-रिपाइं आघाडीला मागच्या निवडणुकीपेक्षा चांगले यश मिळेल, असा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. 48 पैकी 30 जागा आघाडीला तर 18 जागा शिवसेना-भाजपा युतीला मिळतील असा अंदाज आहे. तिसरी आघाडी, बसपा, मनसेने यावेळी अनेक उमेदवार उभे करून जोर लावला असला तरी त्यांना यश मिळणार नसल्याचे सर्वेक्षणात पुढे आले आहे. राज ठाकरेच खरे वारसदार!या सर्वेक्षणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार कोण असावेत, या प्रश्नावर 50 टक्के लोकांनी राज ठाकरे यांच्या बाजूने कौल दिला आहे. तर उद्धव ठाकरे यांना 32 टक्के मतदारांची पसंती मिळाली आहे. 35 टक्के मतदारांनी राज ठाकरे यांचे परप्रांतियांविरूद्धचे आंदोलन योग्य असल्याचा कौल दिला आहे तर 57 टक्के मतदारांनी अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)