"This site is dedicted To Bhartiya Janta party....linked with LKAdvani.org and available at all BJP websites.....Vote for Young, educated and dynamic BJP Candidate Sunil B Gayakwad form Latur. "
आपल्या बेबंद बोलण्याने निवडणूक आयोगाचा रोष ओढवून घेतलेला वरूण संजय गांधी आक्रमक हिंदुत्वाचा नवा चेहरा बनू पाहतोय. गांधी घराण्यात जन्म झाला असला तरी त्या घराबाहेरच सारी जडणघडण झालेल्या या तरुण नेत्याविषयी. .. संजय गांधींचे जून १९८०मध्ये विमान अपघातात निधन झाले तेव्हा वरूण अवघा तीन महिन्यांचा होता. नंतर इंदिरा गांधींचे घर मनेकाने सोडले, तेव्हा त्याचे वय होते २ वषेर्. इंदिरा गांधींचे संजयवर निरतिशय प्रेम. साहजिकच त्याच्या अकाली मृत्यूनंतर वरूणवर आजीचा जीव जडला. लहानगा वरूण इंदिराजींना हवाहवासा वाटे. चौथ्या वाढदिवशी त्याला भेटावे, अशी आजीला कमालीची ओढ लागली होती, पण मनेकाने ते घडू दिले नाही. वरूणचा ताबा मिळवण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी बळाचा वापर करीत आहेत. त्याचे अपहरण करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा कांगावा मनेकाने केला. इंदिराजी निराश झाल्या. आजीला न भेटताच वरूणचा वाढदिवस पार पडला. सासू-सुनेच्या वादात वरूणचा वाढदिवस कोरडा जाऊ नये, यासाठी सोनिया गांधी त्याच्या शाळेत गेल्या अन् इंदिराजींतफेर् त्याला भेटवस्तू आणि मिठाई देऊन आल्या. त्याच वषीर् ऑक्टोबरमध्ये इंदिराजींची हत्या झाली. तेव्हाही हा लाडका नातू आईच्या अहंकारापायी आजीपासून दूरच राहिला. वरूण तसा केवळ जन्माने गांधी. नेहरू-गांधी घराण्याची राजवंशी परंपरा, बलिदान आणि त्यागाच्या छायेत त्याचे संगोपन कधी झालेच नाही. वरूणचे प्राथमिक शिक्षण आंध्र प्रदेशातल्या ऋषी व्हॅली स्कूलमध्ये झाले. अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण 'लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स'मध्ये घेतल्याचे वरूण म्हणतो. त्यानंतर लंडनच्याच 'स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज्'मधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्याचा त्याचा दावा आहे. मात्र, नेमक्या कोणत्या पदव्या त्याने मिळवल्या, याविषयी संभ्रम आहे. पिलिभीतमधले वरूणचे भडक भाषण वाहिन्यांवर पाहिल्यावर, या दोन्ही संस्थांचे प्राध्यापक आणि माजी विद्याथीर् संघाने आपल्या संस्थेची जगात बेअब्रू होऊ नये, यासाठी त्वरेने ऑनलाईन पिटीशन जारी केले. वरूणच्या भाषणाशी आम्ही मुळीच सहमत नाही, असे त्यात म्हटले आहे. मनेका वरूणच्या जन्मापासूनच राजकारणात सक्रिय होत्या. पिलिभीतच्या राजकीय समरांगणाची ओळख मनेकांनी वरूणला ऑगस्ट ९९मध्ये करून दिली तेव्हा त्याचे वय होते १९. आईच्या प्रचारसभांमध्ये तो भाषणे करू लागला. २००२ च्या सुमारास, त्याचा काव्यसंग्रह 'द अदरनेस ऑफ सेल्फ' प्रसिद्ध झाला. २००४ साली त्याने आईसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गांधी घराण्याच्या दृष्टीने हा अँटी क्लायमॅक्स होता. या प्रवेशाचे भाजपला अर्थातच खूप अप्रूप वाटले. त्यासाठी पक्षातफेर् मीडिया इव्हेंट घडवला गेला. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी मनेका आणि वरूणसह खास पोझ दिल्या. त्या छायाचित्रांना तमाम वृत्तपत्रे, वाहिन्यांनी ठळक प्रसिद्धी दिली. प्रमोद महाजन तेव्हा म्हणाले, 'भाजपमध्ये वरूण गांधींचे आगमन प्रतिकात्मक आहे. आता निम्मा काँग्रेस पक्ष वरूणच्या पाठोपाठ लवकरच भाजपमध्ये विलीन झालेला दिसेल.' सोनियांनी राजकारणात आल्याबद्दल शुभेच्छा देतानाच जातीय विचारांशी संघर्ष करणाऱ्या परिवारातल्या वरूणने भाजपची निवड करावी, याबद्दल खेदही व्यक्त केला. वरूण राहुलपेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. राजकारणात मात्र दोघेही एकदमच आले. राहुल संसदेत पोहोचला तेव्हा वरूण तेव्हाचे सरसंघचालक सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय भविष्याची स्वप्ने रंगवत होता. गांधी घराण्याची विरासत म्हणून ओळखला जाणारा अमेथी मतदारसंघ, सोनियांनी अगत्याने राहुलकडे सोपवला तर मनेकांना नाईलाजास्तव पिलीभीत वरूणच्या हवाली करावा लागला. राहुल दलित कुटुंबात रात्र घालवतो, कलावतीच्या घरात भारतीय शेतकऱ्याचे दैन्य शोधतो तर वरूण मनाच्या व्यथेतला जखमी राजकुमार कवितेत शब्दबद्ध करतो. लोकसभेच्या २००४ सालच्या निवडणुकीत वरूण, भाजपचा स्टार प्रचारक होता. नेमके काय बोलावे आणि काय बोलू नये, हे त्याला समजत नव्हते. तरी गांधी घराण्यावर टीका करण्यासाठी भाजपने त्याचा वापर करण्याचे ठरवले. भाजपमधल्या थिंक टँकच्या ट्रेनिंगनुसार वरूणने सोनियांच्या परदेशी जन्मावर सभांमध्ये हल्ला चढवला. कोणताही भारतीय पांढऱ्या कातडीच्या व्यक्तीला पंतप्रधान मानणार नाही, असे वरूणचे विधान प्रसिद्ध झाले. अर्थात, त्याचे त्याने विनाविलंब खंडन केले. इतकेच नव्हे, तर सोनिया आणि राहुलवर अवास्तव टीका करणाऱ्या नरेंद मोदींचीही त्याने जाहीर हजेरी घेतली. बूमरँग असे आपल्यावरच उलटल्याचे पाहून भाजपने पुढे मध्य प्रदेशात विदिशा आणि उत्तर प्रदेशात मिर्झापूर मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत वरूणचे तिकीट कापले. आज वरूण हिंदुत्वाचा फ्रंट रनर बनू इच्छितो. त्यासाठी मुस्लिम समुदायाचे तोे हात तोडायला निघाला आहे. ऑक्टोबर २००४ मधे हाच वरूण, महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचार मोहिमेत, अल्पसंख्यांसाठी काँग्रेसने पन्नास वर्षांत काय केले, असे विचारीत होता. राजकीय अपरिपक्वतेचे यापेक्षा ठळक उदाहरण काय असू शकेल? लोकसभेत राहुल आल्याने, वरूण कधी एकदाचा लोकसभेत येतो, याची घाई मनेकांना झाली होती. भाजपने दोनदा त्याचे तिकीट कापल्याने मनेकांना स्वत:चा मतदारसंघ अखेर त्याला सोडावा लागला. वरूणच्या भाषणापासून स्वत:ला दूर ठेवणाऱ्या भाजपने त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून चटकन कडेवरही घेतले. विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवाराचा एका झटक्यात तो लाडका बनला. वरूणपेक्षाही जहरी शब्दप्रयोग पूवीर् विनय कटियारही करायचे. कालपरवापर्यंत कल्याणसिंगही तीच भाषा बोलायचे. मोदींना तर उन्मादी शब्दांचे कधीच वावडे नव्हते. पण वरूणचे वादग्रस्त भाषण या सर्वांपेक्षा झटपट अग्रस्थानी आले कारण जन्माने तो गांधी आहे. राजकारणाच्या ताज्या उन्मादी हवेने वरूण आणि राहुल यांना आता थेट समोरासमोर आणून उभे केले आहे. भाजपचे हे यश की अपयश? हे ज्याने त्याने ठरवावे.
तुमचा प्रतिसाद
मराठीत टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट येत असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अन्यथा दुसरा ऑप्शन निवडा, ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच majhya mate असे लिहिल्यावर आपोआप माझ्या मते असे दिसू लागेल. तसंच इथं असलेला वर्चुअल किबोर्ड वापरूनही मराठीत लिहू शकता. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर तिसरा पर्याय उपलब्ध आहे. विषयावर पत्र लिहिणारे तुम्ही पहिलेच
Contact us
Dainik Lokshasan Editor- Sunil kumar B gayakwad Blog designed by Vaidehi sachin
All rights reservewd with Vastala Baliram Pakashan Kendra
व्यंगचित्र
व्यंगचित्र
विशेष लेख
भालचंद्र पेंढारकरवयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी "ललित कलादर्श' नाटक कंपनीची अचानक अंगावर पडलेली जबाबदारी भालचंद्र पेंढारकर उर्फ आण्णांनी जिद्दीने स्वीकारली आणि अथक परिश्रम, निर्धाराने सलग 64 वर्षे या कंपनीचा झेंडाही फडकत ठेवला. खास लोकाश्रया-खालील अशी बिरुदावली मिरवत संस्थापक संगीत सूर्य केशवराव भोसले यांनी अल्पा-वधीतच ललिक कलादर्शचा नावलौकिक देशभर वाढवला. पण, अल्पवयातच त्यांना आजाराने गाठले. वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्यांनी कंपनीची सूत्रे बापूराव पेंढारकर यांच्याकडे सोपवली. त्यांनीही या कंपनीतर्फे रंगभूमीवर नवनवी संगीत नाटके आणून, कंपनीला प्रतिष्ठा मिळवून दिली. पण बापूरावांचे 1937 मध्ये अचानक निधन झाले. आपल्या वडिलांच्या निधनाने खचून न जाता, भालचंद्र पेंढारकर यांनी आपले वडील आणि केशवरावांचे गुरु पं. रामचंद्रबुवा वझे यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याची शास्त्रीय संगीताची गायकी शिकल्यावर वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी, संगीत नाटक रंगमंचावर आणून कंपनीला नवसंजीवनी दिली. पु. भा. भावे यांचे "स्वामिनी' सत्तेचे गुलाम, ही नाटके त्यांनी रंगमंचावर आणली. संगीत भावबंधन या ललित कलादर्शच्या नाटकात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर भूमिका करीत असत. 1957 मध्ये "दुरितांचे तिमिर जावो' हे नवे नाटक त्यांनी रंगमंचावर आणले आणि त्यानंतर यशाचे गौरीशंकर त्यांनी बघता बघता काबीज केले. याच नाटकात ते करीत असलेली दिगूची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. अवघ्या दोन महिन्यात बंगलोर, मद्रास, दिल्ली या शहरांसह पंडीतराज जगन्नाथ या नाटकाचे देशभरात साठ प्रयोग करायचा विक्रमही भालचंद्र पेंढारकर यांनी करून दाखवला. माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, यांनी हे नाटक पाह ून, त्यांची मुक्त कंठाने प्रशंसाही केली होती. या नाटकाचे एक हजार प्रयोग करायचा नवा विक्रमही त्यांनी करून दाखवला. जय जय गौरीशंकर, 52 खणी, रक्त नको मज प्रेम हवे, झाला अनंत हनुमान यांसह पेंढारकरांनी अनेक नाटके संगीत रंगभूमीवर आणली. संगीत रंगभूमीची परंपरा अखंड ठेवली. कोणत्याही परिस्थितीत ललित कलादर्श बंद पडू देणार नाही, हे आपल्या वडिलांना दिलेले वचन त्यांनी अनेक संकटांवर मात करीत पाळले, हे त्यांचे विशेष कार्य होय. आता नानासाहेब सरपोतदार जीवन गौरव पुरस्काराने संगीत मराठी रंगभूमीच्या निष्ठावान सेवकाचा गौरव होत आहे, हा त्यांच्या नाट्यसेवेचाच गौरव होय!
प्रबोधनकार रा. ना. चव्हाण
प्रबोधनकार रा. ना. चव्हाणज्येष्ठ विचारवंत रा. ना. चव्हाण यांच्या सोळाव्या स्मृतिदिनानिमित्त रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानतर्फे वाई येथे 10 एप्रिल 2009 आज रमेश चव्हाण यांनी रा. ना. चव्हाण यांच्या निवडक लेखांचे संपादन केलेल्या "महात्मा फुले' सत्यशोधक समाज आणि समाजप्रबोधन' या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. या पुस्तकाला डॉ. रमेश जाधव यांनी लिहिलेल्या विवेचक प्रस्तावनेचा हा सारांश.पाच तपाहून अधिक काळ रा. नां. ची लेखणी आणि वाणी अविरतपणे आणि अथकपणे जात, धर्म, पंथ, वंशवाद, भाषा इत्यादी मानवनिर्मित सर्वांगीण विषमतेचे अडथळे पार करून अवघ्या मानव समाजाचे कल्याण व्हावे, मंगल घडून यावे यासाठी कार्यरत होती. समतोल, संयम आणि समन्वय ही त्यांच्या लेखणीची अंगभूत अशी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यामुळेच बहुजनांचा केवळ "कैवारी' बनून अभिजनांचा सदैव "मारेकरी' अशी जात्यांध भूमिका त्यांनी कधी स्वीकारलेली दिसत नाही!महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया हाच त्यांचा लेखनाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळे शिव छत्रपती, फुले, शाहू, महर्षी शिंदे, डॉ. आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, लोकहितवादी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, आगरकर-टिळक, चिपळूणकर पिता-पुत्र इत्यादी समाजाच्या बहुजन आणि अभिजन या दोन्ही स्तरांमधील कर्तेपुरुष, त्यांच्या विविध चळवळी, वर्गसंघर्ष, महाराष्ट्राचे समाजकारण आणि समाज सुधारकांमधील संघर्ष आणि सहयोग, धर्मविवेचन, ग्रंथ परीक्षणे, पत्रे या स्वरुपात रा. नां. नी अमाप लिहून ठेवले आहे.जोतिरावांच्या चरित्रात महाराष्ट्राचा महत्त्वाचा इतिहास ग्रंथित झालेला आहे. असा दृढ विश्वास ठेवून "सत्याचा पालनवाला। हा धन्य जोतिबा झाला।' अशा शब्दात महात्मा फुले यांचा मनोभावे गौरव करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजींच्या सहवासात रा. नां. चे फुलेविषयक चिंतन अंकुरले आणि बहारले.रा. नां. नी पाच तपाहून अधिक काळ जी दीड हजार लेखांची निर्मिती केली त्यापैकी सुमारे 500 लेख हे महात्मा फुल्यांच्या संबंधीचे आहेत. यापूर्वी त्यांचे "महात्मा फुले : शोध आणि बोध' आणि "महात्मा फुले यांचे नवदर्शन' असे अनुक्रमे सात आणि सहा लेखांचे संग्रह प्रसिध्द झाले आहेत. या संदर्भातील महात्मा फुले, सत्याशोधक समाज व सामाजिक प्रबोधन हा तिसरा लेखसंग्रह प्रसिध्द होत आहे. प्रस्तुत संग्रहामध्ये एकूण 17 लेख आहेत. म्हणजे आजमितीला रा. नां. च्या महात्मा फुल्यांवरील 500 लेखांपैकी केवळ 30 लेख ग्रंथ स्वरुपात आपल्यापुढे येत आहेत.महात्मा फुल्यांवरील काही लेखांमध्ये जोतिरावांना त्यांच्या तरुणपणी ब्रिटिश सरकार उलथून टाकण्यासाठी सशस्त्र क्रांतीकडे कसे आकर्षित झाले होते हे त्यांच्याच (फुल्यांच्या) शब्दात रा. नां. नी नोंदविले आहे. त्यानंतर महात्मा फुले यांनी 1873 मध्ये लिहिलेल्या गुलामगिरीच्या इंग्रजी प्रस्तावनेत डेलळरश्र वशोलीरलू ळी ीोशर् ींळींरश्र ींहरप िेश्रळींळलरश्र ळपवशशिपवशपलश' असा आपला विचार ठामपणे मांडतात. परंतु "श्री छत्रपती शिवाजी महाराज ते सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले' या प्रस्तुत ग्रंथातील प्रदीर्घ लेखामध्ये राजकीय स्वातंत्र्यासाठी सर्व आयुष्य पणाला लावणाऱ्या शिवछत्रपतींचे जीवन आणि बहुजनांची अभिजनांच्या धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीच्या जोखंडातून मुक्त करणाऱ्या महात्मा फुल्यांच्या जीवनामध्ये रा. ना. साम्य शोधतात. राजकीय स्वातंत्र्याइतकेच देशातील बहुजनांचे नव्हे तर संपूर्ण मानव जातीचे धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहणे हे महत्त्वाचे होते हे ध्येय समोर ठेवून महात्मा फुले आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत झगडले, झटले!म. फुल्यांचा साहित्यविषयक दृष्टिकोनमराठी साहित्य निर्मिती, साहित् य संमेलने, ग्रंथ प्रकाशने, पुरस्कारांचे सोहळे या सर्वच बाबतीत अजूनही आपलीच "मिरासदारी' असावी अशी अभिजनांची दुराग्रही भूमिका असते. त्यामुळे साहित्याचे ग्रामीण, दलित, विमुक्त, विद्रोही अशा प्रकारचे वर्गीकरण त्यांना मान्य नसते. महात्मा फुल्यांसारख्या प्रेषिताने हे भविष्य सुमारे 125 वर्षांपूर्वीच वर्तविले होते. त्यामुळे 1885 मध्ये पुणे येथे कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भरणाऱ्या ग्रंथ संमेलनाचे न्यायमूर्ती रानडे यांनी पाठविलेले निमंत्रण महात्मा फुल्यांनी स्वीकारले. त्या निमंत्रणाबद्दल आनंद व्यक्त केला परंतु त्या ग्रंथ संमेलनास हजर राहण्यास स्पष्ट नकार दिला होता. महात्मा फुले ग्रंथ संमेलनाच्या संयोजकास पाठविलेल्या पत्रात मोठ्या संयमाने परंतु सात्विक संतापाने लिहितात, "परंतु माझ्या घालमोठ्या दादा, ज्या गृहस्थाकडून एकंदर सर्व मनुष्यांच्या मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यांस ते हक्क त्यांच्याच खुषीने व उघडपणे देववत नाहीत व चालू वर्तनावरून अनुमान केले असता पुढेही देववणार नाहीत. तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी आणि त्यांनी केलेल्या पुस्तकांतील भावार्थांशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही.' या ठिकाणी रा. नां. ची संयत आणि समन्वयवादी लेखणी महात्मा फुले साहित्य संमेलनास हजर राहिले नाहीत, परंतु त्यांनी त्या संमेलनास विरोध केला नाही हेही सांगून जाते.महात्मा फुले आणि शाहू छत्रपती हा विग्रह नसून तो "सामाजिक समास' आहे. ते द्वैत नसून अद्वैत आहे! हा अतिशय महत्वाचा विचार रा. ना. चव्हाण आणि वि. भि. कोलते हे बहुजन समाजातील ज्येष्ठ विचारवंत सातत्याने मांडत असल्यामुळे बहुजन समाजापासून दलित समाज पूर्णपणे अलग करण्याचा अभिजनांचा सांस्कृतिक कट उधळून लावण्याचे मोलाचे कार्य त्यांनी पार प ाडले आहे हे खुल्या मनाने मान्य केले पाहिजे.शाहू छत्रपतींनी सत्यशोधकी टीळा कधी लावला नाही! त्यांनी महात्मा फुल्यांच्या नामाचा गजर कधी केला नाही! परंतु महात्मा फुले यांचा समता आणि स्वातंत्र्याचा विचार त्यांनी प्रत्यक्षात कार्यवाही करण्याचे लाख मोलाचे कार्य आयुष्याच्या अखेरपर्यंत केले, हे त्यांच्या विरोधकांना देखील मान्य करावे लागेल. रा. नां. ची लेखणी यासाठी सदैव कार्यरत होती, तेच त्यांचे मागणे होते. सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ या दोन्ही चळवळी जेव्हा पूर्ण जोशात होत्या तेव्हा त्यांचा "याच देही याचा डोळा' अशा प्रकारचा अनुभव आचार्य जावडेकर, न. र. फाटक आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या ज्येष्ठ विचारवंतांनी घेतला होता. त्या सर्वांची साक्ष, "सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामध्ये द्वैत शोधू नये! अशीच आहे. म्हणून रा. नां. नी या संदर्भात वेळोवेळी व्यक्त केलेले विचार सत्याच्या अधिक जवळ जाणारे आहेत हे मान्य केले पाहिजे.रा. ना. मात्र फुले, शाहू आणि आंबेडकर या महापुरुषांनी "बहुजन हिताय! बहुजन सुखाय!' या विचाराप्रमाणे केलेल्या कार्यामध्ये समान अतूट धागा कसा आहे याचा मन:पूर्वक शोध घेत असतात. डॉ. आंबेडकर, महात्मा फुल्यांना गुरुस्थानी मानत होते. महात्मा फुले हे डॉ. आंबेडकरांचे पूर्वावतारच म्हणावे लागतात हे सांगून ते महात्मा फुल्यांचे द्रष्टेपण त्यांच्याच शब्दात पुढीलप्रमाणे मांडतात, "माझ्यानंतर एक (महाशूद्र) सत्पुरुष येईल. समाधीवर पुष्पवृष्टी करील. उल्हास करील. शाहू छत्रपतींनी महात्मा फुल्यांची ही भविष्यवाणी अधिक वास्तव आणि खरी असल्याची ग्वाही माणगाव येथे भरलेल्या अस्पृश्यवर्गाच्या परिषदेत दिली होती.रा. ना. "डॉ. आंबेडकर व राजर्षी शाहू छत्रपती' या लेखामध्ये या तीन महापुरुषांमधील एकरुपत ा पुढील शब्दात व्यक्त करतात. डेलळरश्र वशोलीरलू ळी ीोशर् ींळींरश्र ींहरप िेश्रळींळलश्र ळपवशशिपवरपलश' हे महात्मा फुले, शाहू व डॉ. आंबेडकर यांचे सूत्र व एकमय मत होते. तिघांनाही स्वातंत्र्य हवे होते. पण ब्रिटिश राज्यात मागासलेल्यांना व अति मागासलेल्यांना पुढे येण्याची पेशवाईनंतर जी अपूर्व नवी संधी प्राप्त झाली होती, तिचे महत्व तिघेही जाणत होते. तिघेही ब्राह्मणेतर चळवळीचे पुरस्कर्ते व नेते होते.'यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाचा मन भरून ते गौरव करतात. फुले-आंबेडकर विचारसरणी मधील कटुता टाळून समन्वयवादी विचारांनी त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले, कॉंग्रेस बहुजनांची केली. यशवंतरावांची जडण-घडण ही त्यांचे अनुभव, वाचन, चिंतन आणि जनसंपर्क यामधून झाली होती. त्यासाठी त्यांनी कोणाला गुरु केले नव्हते. तशा प्रकारचा तर्क-वितर्क निर्माण करणे योग्य नव्हे! असे ते प्रतिपादन करतात. त्याचप्रमाणे बॅरिस्टर पी. जी. पाटील यांनी सरकारी नोकरी आणि राजकीय सत्ता यांचा मोह न धरता कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयतेच्या शिक्षणाची चळवळ समर्थपणे पुढे नेली हे ही मनापासून नमूद करतात
No comments:
Post a Comment